अंबरनाथ (बदलापुर विकास मिडिया)- महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ अतिउच्च दाब वाहिनीवर तातडीचे दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे शुक्रवारी, १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंबरनाथ आणि मोहने परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. महापारेषणने सांगितले आहे की, सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान तुटलेल्या इन्सुलेटर स्ट्रिंगची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामामुळे अंबरनाथ १०० केव्ही आणि मोहने १०० केव्ही उपकेंद्रावर आधारित काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
अंबरनाथ १०० केव्ही उपकेंद्रावरील चिखलोली, सर्वोदय नगर, वसद, जांभुळ, आंबेशिव, वडवली, लादी नाका, गणेश चौक, बुवापाडा, संघटन चौक, फॉरेस्ट नाका, हेंद्रेपाडा, बाजारपेठ, एरंजाड गाव, सोनिवली, बारवी डॅम, बदलापूर गाव, दत्तनगर, सिद्धार्थनगर, बेलवली, सुभाषनगर, पोखरकर नगर, शांतीनगर, विद्यापीठ रोड, पवार सेक्शन, चिखलोली पाडा, गणेश घाट, कात्रप गाव, मोहन हायलँड, आयटीआय, एमजेपी, केमिकल एमआयडीसी, उल्हासनगर-४, अंबरनाथ पूर्व, कानसई गाव, भिडेवाडी, नवरेनगर, म्हाडा लोकनगरी, कैलासनगर, महालक्ष्मी नगर, शिरगाव या भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ८ ते १० दरम्यान बाधित होणार आहे.
तसेच, मोहने १०० केव्ही उपकेंद्रावर आधारित गोवेली, सी ब्लॉक, उल्हासनगर कँप-१ आणि कँप-२, एमआयडीसी वॉटर वर्क्स, उल्हासनगर पाणीपुरवठा, शहाड, मोहने, अटाळी, गाळेगाव, मांडा, आंबिवली या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
महावितरणने सर्व ग्राहकांना याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



